पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले

इमेज
  महात्मा फुले कृषी विद्यापीठात 67 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा  राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनामध्ये गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या विविध पिकांच्या 7 वाणांची निर्मिती , 3 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती व 59 तंत्रज्ञान शिफारशी विद्यापीठाने दिल्या आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये याद्वारे दर्जेदार कृषी शिक्षणाचे काम सुरू आहे. कृषी विस्तार कार्यामध्ये आपण विविध उपक्रम आयोजित करत असतो.  यावर्षी यामध्ये फुले कृषी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केलेले आहे तसेच दहा जिल्ह्यांमध्ये मॉडेल व्हिलेज विकसित करण्याचा मानस आहे. विद्यापीठाने 6900 क्विंटल बियाणे उत्पादन करून बीज्योत्पादनाच्या उद्दिष्टामध्ये मोठी प्रगती साधलेली आहे. यावर्षी एल नीनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे संकेत आहेत त...

वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स २०२६” साठी निवड सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला मानाचा मुजरा

इमेज
  वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स २०२६” साठी निवड सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला मानाचा मुजरा   सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, मनापासून केलेली सेवा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये घेतलेल्या पुढाकारामुळे वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स – २०२६” या नामांकित डॉक्टरेट अवॉर्डसाठी निवड झाली आहे. निवड समितीमार्फत त्यांची निवड जाहीर होताच सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. वृषाली शेळके यांनी मागील काही वर्षांत वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून अनेक गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. आरोग्यविषयक जनजागृती मोहीम, महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे, रुग्णसेवा, रक्तदान उपक्रम, गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचार व आर्थिक मदत अशा अनेक समाजहिताच्या कामांमध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक गोर-गरीब कुटुंबांना आधार मिळाला असून समाजातील दुर्बल घटकांना उभारी मिळावी यासाठी त्या सतत प्रेरणादायी कार्य करत आहेत. सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि समाजहित हेच जीवनाचे ध्येय मानणाऱ्या वृषाली शेळके यांच्या उप...

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

इमेज
मतदान करून हज यात्रेला प्रस्थान  राहुरीत प्रेरणादायी उदाहरण राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान २३ एप्रिल रोजी सकाळीच मतदानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत इस्माईल भाई सय्यद, रेहाना सय्यद, सरदार भाई सय्यद आणि आवेज सय्यद यांनी सकाळी सात वाजताच आपले मतदानाचा हक्क बजावून थेट हज यात्रेसाठी प्रस्थान केले. मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य देत धार्मिक कर्तव्यालाही तितक्याच श्रद्धेने सुरुवात केल्यामुळे या कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे “मतदान प्रथम, नंतर इतर कार्य” हा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला आहे. हज यात्रेसाठी रवाना होत असताना त्यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई शेख तसेच राहुरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आस्मा आरिफ शेख. गुड्डु सय्यद. वसीम सय्यद यांनी केले. विशेष म्हणजे, आस्मा शेख या इस्माईल सय्यद यांची कन्या असून आरिफ शेख हे त्यांचे जावई आहेत. कुटुंबीयांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरणात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या कृत...

भुईमूगात हवामान सहनशील वाणांची निर्मिती होणे गरजेचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव यांची माहिती

इमेज
    भुईमूगात हवामान सहनशील वाणांची निर्मिती होणे गरजेचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव यांची माहिती अधिक उत्पादनक्षम वाण निर्मितीसाठी जीनोमिक निवड, प्रेडिक्टिव ब्रीडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पीड ब्रीडिंग यांचा समावेश होतो. तसेच फेनोटिपिक व जेनोटिपिक क्षमता वाढविणे, अन्नद्रव्य व पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे, आणि गुणवत्ताविषयक घटकांवर भर देणे महत्त्वाचे आहे.  बदलत्या हवामान परिस्थितीत टिकून राहण्यासाठी बहुगुणधर्मीय व हवामान-ताण सहनशील वाणांची निर्मिती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव यांनी केले.  राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय समन्वयित भुईमूग सुधार प्रकल्पाची तीन दिवसीय वार्षिक समूह बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना बोलत होते. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमु...

राहुरी शहरातील पोलीस स्टेशन येथे १३ एप्रिल रोजी झालेल्या खोट्या गुन्ह्या संदर्भात मा.सोमनाथ घार्गे साहेब जिल्हा पोलिस प्रमुख अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले

इमेज
  राहुरी शहरातील पोलीस स्टेशन येथे १३ एप्रिल रोजी झालेल्या खोट्या गुन्ह्या संदर्भात मा.सोमनाथ घार्गे साहेब जिल्हा पोलिस प्रमुख अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले राहुरी पोलिस स्टेशनला सामाजिक कार्यकर्त्या यमुना भालेराव यांचेवर फिर्यादी दाखल करणारा गंगाधर विधाटे यांच्या मुलांनी रमाई आवास घरकुल घोटाळा केल्याचे प्रकरण उघड केले याचा मनात राग धरून त्यांच्यावर व त्यांच्या मुलावर बनाव करून खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे समजले पोलिस स्टेशनच्या आवारात महिलेचे ब्लाऊज फाडून विनयभंग होणे हे हास्यास्पद असून असा खोटा गुन्हा त्यांच्या मुलावर दाखल केला आहे.यमुनाताई भालेराव या एक प्रामाणिक सामजिक कार्यकत्या आहेत त्या पोलिस स्टेशनच्या दक्षता समितीवरही उत्कृष्टकाम करतात गेली २५ ते ३० वर्षापासून त्याचे सामाजिक कार्य सुरु. आहे ताहाराबाद येथील रमाई आवास घरकुल घोटाळा उघड न करण्यासाठी यमुनाताई भालेराव यांना पोलिस स्टेशन ठाणे अंमलदार कक्षातच हातवारे करून व अश्लिल भाशा वापरली ते योग्यच आहे का? दुपारी ३ ते ७ च्या दरम्यान शेतामध्ये मुलगा वांगे तोडीत असताना त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घ...

शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे भुईमूग पिकाच्या आखिल भारतीय वार्षिक बैठकीचे आयोजन

इमेज
 शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे भुईमूग पिकाच्या आखिल भारतीय वार्षिक बैठकीचे आयोजन   महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि भाकृअप - भारतीय भुईमूग संशोधन संस्था, जुनागढ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे दि. २१ ते २३ एप्रिल, २०२६ रोजी अखिल भारतीय समन्वित भुईमूग सुधार प्रकल्पाच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.   कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात दि. २१ एप्रिल, २०२६ रोजी होणाऱ्या उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित असणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उप-महासंचालक (पीक शास्त्र) डॉ. डी. के. यादव हे उपस्थित असणार आहेत. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (तेलबीया व कडधान्ये) डॉ. संजीव गुप्ता हे उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी जुनागड येथील भाकृअप- भारतीय भुईमूग संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. बेरा उपस्थित राहणार आ...

कोल्हारच्या प्रतिक बनसोडेची दैदिप्यमान कामगिरी; एमपीएससीत राज्यात १७ वा

इमेज
  कोल्हारच्या प्रतिक बनसोडेची दैदिप्यमान कामगिरी; एमपीएससीत राज्यात १७ वा    कोल्हार खुर्द या ग्रामीण भागातील प्रतिक मनिषा संतोष बनसोडे याने अतुलनीय यशाला गवसणी घालत राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला आहे. त्याची नगर रचना अधिकारी श्रेणी १ या राजपत्रित अधिकारी पदी नियुक्ती मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.   ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत निकोप नि नक्कीच स्पर्धा करु शकतात हे प्रतिक च्या यशाने अधोरेखित केले आहे. जेमतेम खाजगी शिकवण मात्र जिद्द नि आत्मविश्वास, बरोबरच आई, वडिलांच्या समर्पक मार्गदर्शनामुळेच यशस्वी होवू शकलो ही त्याची प्रतिक्रीया नक्कीच बोलकी आहे. हरहुन्नरी असलेला प्रतिक अभ्यास करताना आत्मसात करण्याच्या वृत्तीमुळेच या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात या यशापर्यंत पोहोचल्याचे म्हणाला. त्याच्या या यशाबद्दल युवा ग्रामीण पत्रकार संघासह अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. दिपक साळवे सह योगेश पवार. NEWS 14 

समाज माध्यमातील जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले यांनी केले

इमेज
  समाज माध्यमातील जाहिरातींवर  विश्वास ठेवू नये असे आवाहन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले यांनी केले    महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागांतर्गत बहुव्यापक  योजना कार्यरत आहे. सदर योजनेअंतर्गत कंत्राटी/कराराधारित पदभरतीसंदर्भात फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, राहुरी विधानसभा मतदारसंघातील आचारसंहितेमुळे सदर पदभरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, आचारसंहिता उठल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे सुधारित पत्रक (Corrigendum) विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. दरम्यान, काही समाज माध्यमांद्वारे या भरती प्रक्रियेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. सदर भरती ही केवळ कराराधारित असूनही ती शासनाची कायमस्वरूपी भरती असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. तसेच, निवड प्रक्रियेत सर्व अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल असेही चुकीचे दर्शविण्यात येत आहे. प्रत्यक्षात, अधिसूचनेनुसार उमेदवारांच्या शैक्षण...

महात्मा फुले कृषि विद्यापीठात महात्मा जोतीबा फुले यांची 199 वी जयंती उत्साहात साजरी

इमेज
  महात्मा फुले कृषि विद्यापीठात महात्मा जोतीबा फुले यांची 199 वी जयंती उत्साहात साजरी  प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. सचिन सूर्यवंशी म्हणाले यावर्षीपासून महात्मा फुलेंचे द्विशताब्दी वर्ष सुरू होत आहे. महात्मा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार अजूनही दिशादर्शक आहे. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती. ज्या गोष्टींसाठी त्यांनी त्यावेळी संघर्ष केला त्या गोष्टींसाठी आजही सामान्य जनतेला संघर्ष करावा लागत आहे. स्त्री शिक्षणाचा त्यांनी नुसताच विचार मांडला नाही तर ते कृतीत आणून दाखविले. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी त्यांनी लढा उभा केला.  मानव जातीच्या समतेसाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. शेतीला विज्ञानाची जोड द्या, यांत्रिकीकरणावर भर द्या असे पत्र लिहून इंग्रजांना सांगणारे हे पहिले भारतीय होते. पीक स्पर्धा आयोजित करा, गोहत्या थांबवा, जलसंधारण करा असे राज्यकर्त्यांना सांगणारे ते पहिले थोर पुरुष होते.  आपल्या राज्याच्या मातीत समतेचे बीज पेरणाऱ्या ह्या थोर पुरुषाची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची एक संधी आहे. आपल्या विचारांना कृतीत आणून त्या उपक्रमा...

राहुरी राजवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती उत्साहात साजरी

इमेज
  राहुरी राजवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती उत्साहात साजरी* राहुरी तालुक्यातील राजवाडा येथील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता राजवाडा समाज मंदिर येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या   निमित्ताने सायंकाळी ७.०० वाजता सुप्रसिद्ध शिवव्याख्याते हसन सय्यद यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असून समाजातील अंधश्रद्धा, शिक्षण, समता आणि सुधारणा याविषयी त्यांचे मार्गदर्शन सर्वांना चिंतन देणारे ठरले. कार्यक्रमाला जयभीम मित्र मंडळाचे अध्यक्ष विलास नाना साळवे किरणभाऊ साळवे दादु साळवे भूषण साळवे अजय साळवे (ग्राममहसूल अधिकारी) विवेक सगळगिळे अजिंक्य शिंदे अमोल साळवे (ग्रामसेवक)अनुप साळवे डॉ. देवेंद्र शिंदे तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजात समानता, बंधुभाव आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले हे कार्यक...

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त राहुरी राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळालाअनुसंगम शिंदे सर यांनी अथक परीश्रम घेतले .

इमेज
  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त राहुरी राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेत बाबासाहेब मन्तोडे प्रथम डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजन.साक्षी मस्के व पृथ्वीराज साठे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक.महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत बाबासाहेब मन्तोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे होते. तर व्यासपीठावर रिपाइंचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नाना साळवे, अनुसंगम शिंदे सर.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरीष गायकवाड, सत्येंद्र तेलतुंबडे, पत्रकार आप्पासाहेब मकासरे, पलघडमल आदी उपस्थित होते. या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक रंगनाथ धिगळे, तर तृतीय पारितोषिक कार्तिक झेंडे आणि राधाजी गायकवाड यांनी मिळवले. तसेच साक्षी मस्के आणि पृथ्वीरा...

शहराचे ग्रामदैवत मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट (खंडोबा) महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचा फड रंगला

इमेज
 शहराचे ग्रामदैवत मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट (खंडोबा) महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचा फड रंगला. यावेळी हरियाणाचा मल्ल साहिल कोहली ने 2025 महाराष्ट्र केशरी दादा शेळके ला लपेट डाव टाकत चितपत करत टाळ्यांच्या कडकडाटामध्ये 2 लाख 51 हजाराचे रोख पारितोषिक पटकविले. या कुस्त्यांसाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील देशभरातून आलेल्या सुमारे 250 मल्लांच्या 13 लाख रुपयांच्या कुस्त्या पार पडल्या.  या कुस्त्या पार पाडण्यासाठी नितीन शिंदे, आप्पा निकम व संभाजी मगदूस यांच्यासह यात्रा कमिटी व गावाकऱ्यांचे मोठे योगदान लाभले असल्याचे मत मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राऊसाहेब (चाचा) तनपुरे यांनी बोलतांना व्यक्त केले .   यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, नामदेवराव नवले, राजेंद्र बापु जाधव, प्राध्यापक गणपतराव काकडे, रामचंद्र सारंग, दिलीप अण्णा टोम्पे, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, ताराचंद तनपूरे, डॉ. धनंजय मेहेत्रे, प्रदीप भुजाडी, भिकूशेठ भुजाडी, रवींद्र आहेर, मनोज लोंढे, डॉ. कलाटे, नितीन शिंदे, भास्क...

कृषी मूल्य साखळी बळकटीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला

इमेज
 कृषी मूल्य साखळी बळकटीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला शैक्षणिक संशोधन आणि खाजगी कृषी उद्योग यांतील दरी कमी करून मूल्य साखळी बळकटीच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. हा करार नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स मुख्यालयात कुलगुरू डॉ. विलास कर्चे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सामंजस्य करारावर कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी तर सह्याद्री फार्म्सच्या वतीने सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.  याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करताना म्हणाले, "या सामंजस्य करारांतर्गत संयुक्त संशोधन, विस्तार सेवा व प्रगत प्रशिक्षण उपक्रम राबवून संपूर्ण कृषी मूल्य साखळी बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कौशल्याचा आणि सह्याद्री फार्म्सच्या व्यापक शेतकरी जाळ्याचा लाभ घेत, शेतकऱ्यांसाठी परिणामका...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त"भीम काव्य"स्पर्धा

इमेज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त"भीम काव्य"स्पर्धा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त जय भीम मित्र मंडळाने राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केल्या आहेत,  अशी माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी दिली.  शुक्रवार दिनांक १० एप्रिल ला राजवाडा या ठिकाणी भीम काव्य स्पर्धा सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक रुपये २१०१/- सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,द्वितीय पारितोषिक रुपये 1501 सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक १००१ सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,उत्तेजनार्थ दोन पारितोषिके रुपये ५०० सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.सर्व कवींना जयभीम मित्रमंडळाच्या वतीने अल्पोपहार व चहा दिला जाणार आहे.या स्पर्धेसाठी नामांकित कवी देवदत्त सूर्यवंशी उपस्थित राहणार असून स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.कातोरे(बेलवंडी)प्रा. होन(टाकळीमिया) कवयित्री मनीषा पटेकर कोल्हार हे राहणार आहेत.      स्पर्धेसाठी नाममात्र न...

राहुरी दुध भेसळ प्रकरणी संतोष धसाळ चा पाठीराखा कोण आणि त्याच्या मोबाईल ची सी डी आर तपासणी होणार का असा प्रश्न

इमेज
राहुरी दुध भेसळ प्रकरणी संतोष धसाळ चा पाठीराखा कोण आणि त्याच्या मोबाईल ची सी डी आर तपासणी होणार का असा प्रश्न    दोन दिवसांपूर्वी दूध भेसळ प्रकरणात तांदूळवाडीचा संतोष धसाळ याला त्याच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले होते आता पुन्हा मंगळवारी 5,30 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संतोष धसाळच्या घराची झाडाझडती घेतली या झाडा झाडतीमध्ये पोलिसांना काय पुरावे मिळाले हे समजू शकले नाही परंतु आरडगाव येथील अक्षय निकम या युवकाला पोलीस पथकाने ताब्यात घेतल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संतोष धसाळ चा पाठीराखा नेमका कोण आहे हे त्याच्या मोबाईल च्या सी डी आर तपासणी नंतर समोर येईल. ही तपासणी होईल का असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चा आहे   अक्षय निकम हा मुलगा काही वर्षापासून संतोष धसाळच्या घरी कामाला आहे त्यामुळे संतोष धसाळच्या काही काळया कारनाम्यात अक्षय निकम सहकार्य करीत असल्याचा संशय यातून निर्माण होत आहे संतोष धसाळ यास नेवासा फाटा येथील दूध भेसळखोराशी लागेबादे असल्याची चर्चा समोर आली होती या दोघात आर्थिक देवाणघेवणीच्या व्यवहार झाल्याची...